1)कुठलाही रवा (अगदी बाजारातून आणलेला इडली रवा का असेना) बाजारातून आणल्यावर भाजून आणी रूम टेंपरेचरला आणून मग बरणीत किंवा डब्यामध्ये भरावा.
असे केल्याने कुठलाही रव्यास अळी लागत नाही. आणी उपमा किंवा शीरा करताना रवा भाजण्यासाठी लागणारा वेळ वाचतो(सकाळी घाईच्या वेळी)
इडली रवा भाजून मग इडली साठी वापरला तरं इडली हलकी होते
2)साबुदाणा आणल्यानंतर कोरडा भाजून, रूम टेंपरेचरला आल्यानंतर बरणीत किंवा डब्यामध्ये भरावा.
भाजून घेतल्याने साबुदाण्यातील स्टार्च कमी होते आणी खिचडी मोकळी होते.
तसेच पचायलाही खिचडी हलकी होते.
4)लोण्यासाठी साठवली जाणारी मलई नेहमी फ्रिजरमध्ये ठेवावी. म्हणजे ती कडसर होतं नाही.
5)लोणी कढवताना, तीन,चार वेळा लोणी थंड पाण्यानी धुवून घेतले की तूप लवकर खराब होत नाही (म्हणजे तुपाचा खमंगपणा खूप दिवस ताज्या केलेल्या तुपासारखाच राहतो)
तूप करताना त्यामध्ये चिमुटभर मीठ,हळदीच पानं किंवा विड्याच पानं घालावं(ह्यामुळे तूप रवाळ होतं आणी बेरी खाली बसते)
6)गुळपोळीसाठी गुळ डायरेक्ट पातळ करून घेण्यापेक्षा, कुकर मध्ये, घट्ट झाकण असलेल्या डब्यामध्ये गूळ आणी थोडेसे तेल घालून,कुकरच्या तीन शिट्या काढणे.(असे केल्याने गूळ, लोण्यासारखे मुलायम होते आणी पोळीच्या काठापर्यंत व्यवस्थीत सरकते). गूळपोळी करीता बेसन भाजण्या करीता देखील तेलंच वापरावे.(तूप थंड झाल्यावर थिजतं आणी मग पिठाच्या किंवा सारणाच्या गुठळ्या होतात). गुळपोळीच्या वरील आवरण असणार्या पिठामध्ये गव्हाच्या पिठाबरोबर थोडे बेसनही मिक्स करावे ( असे केल्याने सारणातील गूळ बाहेर पडतं नाही. हे प्रमाण चार वाटी गव्हाचे पीठ असेल तरं मूठभर बेसन, असे असावे)
7)तीळ,खसखस नेहमी कोरडे भाजून साठवावेत (नाहितर ह्या पदार्थाना लवकर अळी लागते)
8)वेलची नेहमी मिरी बरोबर ठेवावी(म्हणजे वेलची खराब होत नाही. आणी सुगंधही कमी होतं नाही)
9)हींग,सुखे खोबरे नेहमी तुरडाळीमध्ये ठेवावे
10)किसलेले ओले खोबरे नेहमी फ्रिजरमध्ये ठेवावे.
नाँर्मल फ्रीजमध्ये किसलेले खोबरे लवकर खराब होतं
11) फ्रीज मधील भाज्यांची साठवणूकही तेवढीच महत्वाची असते. बाजारातून भाजी आणल्यानंतर, ती भाजी तशीच फ्रीजमध्ये नकोंबता व्यवस्थीत साठवल्या तरं त्या भाज्या पंधरा ते बावीस दिवस चांगल्या राहतात. आणी त्या भाज्या वापरताना खराब होणार्या भाज्या आधी वापराव्यात आणी टिकावू भाज्या त्यानंतर वापराव्यात.
भाजी साठवण्याच्या पध्दती -
A) पाले भाज्या सोडून इतरं भाज्या कोरड्या कपड्यांनी पुसून घेणे. मग त्या भाज्या पेपरमध्ये पँक करून सुती जाळीदार कपड्याच्या पिशव्यांमध्ये भराव्यात आणी मग फ्रीजमध्ये साठवाव्यात
(हे करण्याआधी भाजीचा टाकावू भाग आधी काढून घेणे. उदा- मिरचीचे देठ काढून घेणे,फ्लाँवरचे देठ काढून घेणे)
B) पाले भाज्या निवडून घेणे मग कोरड्या कपड्यानी,हलक्या हातानी पुसून घेवून मग पेपरमध्ये रँप करून मग सुती जाळीदार कपड्याच्या पिशवीत साठवणे. आणी ज्या भाज्या आपण आमटीत घालणार आहोत, अशा भाज्या जरास्या तेलामध्ये परतून मग नाँर्मल झाल्याकी डब्यामध्ये भरून ठेवल्याकी वापरायच्या वेळी, वेळही वाचतो आणी तेलात परतल्याने भाजीचा रंग आणी स्वाद कायम राहतो(तेलानी भाजीला ग्रिसींग होते)
C) कोथिंबीर,आले आणी कडिपत्ता निवडून घेवून मग कोरडे झाल्यावर, पेपरमध्ये गुंडाळून प्लँस्टीकच्या कटेंनरमध्ये ठेवल्यास, ह्या गोष्टी महिनाभर चांगल्या राहतात
12)तूरडाळ शिजवण्याआधी कमीत कमी अर्धातास आधी भिजवून घेतली आणी मग शिजवली तरं डाळ एकदम मऊ
शिजते आणी आमटी एकसंध होते.
13) तुप संपलेली बाटली किंवा डबा साफ करण्याआधी त्यामध्ये गरम पाणी किंवा शिजलेली डाळ घालून घेणे आणी मग आमटी करणे.(असे केल्याने बाटलीला लागलेले तूपही वाया जात नाही आणी बाटली साफ करताना त्रासही होतं नाही)
13)दोन,तीन कोरड्या चटणी,मुरांबा घरामध्ये नेहमी असावे(कधी ऐनवेळी एक दोन माणसं जेवण करण्या करिता वाढली तरं किंवा भाजी कमी असेल तरं अशा गोष्टी कामी येतात)
14)मेतकूट,डांगर हे ही प्रकार ऐनवेळी गरज भागावण्या करिता गृहिणीचे सहकारी ठरतात.
15)दही,ताक नेहमी घरी असावे.
16) चिरलेली भेंडी आणी उकडून सोलून घेतलेले बटाटे कमीत कमी अर्धातास फ्रीजमध्ये ठेवून मग भाजी करावी.भेंडीची भाजी कुरकुरीत होते आणी बटाट्याच्या फोडी करताना बटाटा सुरीला चिकटत नाही.
17)कुठलिही स्टप पोळी किंवा पराठा करताना भरले जाणारे सारण आणी वरील आवरण असणारे पीठ, यांचा घट्टपणा किंवा सैलपणा एक सारखाच असायला हवा.(म्हणजे सारण बाहेर पडतं नाही आणी पोळीच्या काठापर्यंत सरकते)
18)पोहे,उपमा,शिरा ,खिचडी असे पदर्थ नेहमी खोलगट कढईत करावेत.(असे केल्याने, वाफ देताना पदार्थावर व्यवस्थीत दाब पडतो. आणी अशा दाबाने पदार्थाला चांगली वाफ मिळते आणी पदार्थ फुलतो आणी हलका होतो)
19)बेसन लाडू करताना त्यामध्ये थोडेसे तळून घेतलेल्या पोह्याची पावडर घातली तरं लाडू टाळ्याला चिकटत नाही
20)अनारसे,कडबोळी,
शंकरपाळे तळल्यावर, कोरड्या पोह्यावर पसरावेत.(पोहे जास्तीचे तेल शोषून घेतात) मग हे पोहे तळून चिवडा करता येतो.
अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या एक गृहिणी म्हणून पदभार संभाळल्यानंतर कधी अनुभवानी, तरं कधी उपाय म्हणून राबवून आत्मसात होतील
--kalyani
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा